महात्मा गांधी म्हटले होते खेडी ( गाव) है स्वयंपुर्ण बनले पाहिजे. पण भारत देशातील खेडीतर काय तालुका , तालुका काय तर काही जिल्हे सुद्धा स्वयंपुर्ण झाले नाही. खेड्यातील जनतेला सर्व काही तिथेच भेटले पाहिजे आरोग्य शिक्षण मनोरंजन. पण काही खेड्यात आणखीन काहीच नाही. झेरॉक्स मेडीकल पंचर चे दुकान हॉटेल कोणत्य ही कामासाठी तालुक्यातच यावे लागते. खेड्यातील तरुण सुद्धा ईतर ठिकाणी व्यवसाय उद्योग करतात. त्यामुळे खेड्याचा विकास होत नाही. या सर्वाला अपवाद Subhash Wagh हे राहणार फुलंब्री शहर येथील पण यांचे मेडीकल खामगाव बाबरा येथे आहे. १२ ते १५ वर्षापासुन ते येथील गावात सेवा देतात. शहरामध्ये त्यांना मेडीकल द्वारे चांगले पैसे भेटले असते पण तेथील उत्पन्नावर ते समाधानी आहे. त्यांना तिथे मेडीकल सेवा देण्याचा आनंद सुद्धा भेटतो. आज त्यांना Pintu Gangawane यांच्या मुळे भेटण्याची संधी मिळाली. कालच राष्ट्रसंत यांचा ग्रामगीता हा ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली. व आज गावातील विकासासाठी खारीचा वाटा उचलणारे सुभाष वाघ यांच्याशी भेट झाली. खेड्याचा विकास म्हणजे देशाचा विकास. ग्रामीण भागात काम करणाऱ्या सर्वाना सलाम